शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांना मिळणार अतिरिक्त 4000 रुपये?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer News: आपला भारत देशा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशात अर्ध्यापेक्षा जास्त जनसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या मार्फत शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात. यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारी योजना आहे. ही योजना केंद्र सरकारची महत्त्वाकांशी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा केले जातात. मात्र हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाहीत दोन हजार रुपयाचा एक हप्ता या पद्धतीने वर्षात तीन हप्त्यांमध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.

या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 19 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 18 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता. त्यानंतर 19 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी शक्यता मीडिया रिपोर्ट मध्य वर्तवली जात आहे. अशातच या योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकार लवकरच या योजनेच्या रकमेत वाढ करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत आहेत. मात्र केंद्र सरकार या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी या योजनेची रक्कम दहा हजार रुपये पर्यंत करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 19 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

म्हणजेच पी एम किसान योजनेच्या रकमेत अतिरिक्त 4000 रुपयाची वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट मध्ये फेब्रुवारी 2025 मध्ये सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात याबाबत निर्णय होऊ शकतो असा दावा केला जात आहे. मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात पहिला अर्थसंकल्प सादर होणार आहे. यामुळे या अर्थसंकल्पात समाजातील विविध घटकासाठी अनेक मोठमोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. सरकारने नुकतेच काही दिवसापूर्वी आठवे वेतन आयोग स्थापित करण्याची घोषणा केली आहे. या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी देखील मोठा निर्णय घेऊ शकते. Farmer News

या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 19 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लोकसभा निवडणुकीत सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका मोदी सरकारला बसला होता, त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. म्हणून आता लवकरच शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा रकमेत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पी एम किसान योजनेतील निधी वाढवला गेला तर लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. गेल्या अनेक दिवसापासून पीएम किसान योजनेच्या निधीत वाढ होण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात याबाबत निर्णय होऊ शकतो. मात्र या संदर्भात अधिकृत माहिती हाती लागलेली नाही. त्यामुळे अर्थसंकल्पात नेमका कोणता निर्णय होईल हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment