Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार? पहा सविस्तर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan Waiver: महाराष्ट्रात नवीन सरकारने कारभाराला सुरुवात केली आहे. हिवाळी अधिवेशन संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. त्यामुळे सरकार त्यांच्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांचे कर्जमाफी कधी करणार? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या वतीने उपस्थित केला जात आहे. महायुती सरकार राज्यात आल्यास 2019 पासून ज्या शेतकऱ्यांवर कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करू अशी घोषणा महायुती सरकारने केली होती. Loan Waiver

या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफ केले जाणार; लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री शेतकरी कर्जमाफी जाहीर करतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र तसे काही झाले नाही. सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून एकदाच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. महाराष्ट्रात 2002 पासून आतापर्यंत तीन वेळा कर्जमाफी करण्यात आलेली आहे. यामध्ये कधी शेतीच्या आकारावर तर कधी किमान रक्कम ठेवून कर्जमाफी करण्यात आली आहे. मात्र आजही शेतकरी कर्जमुक्त होऊ शकला नाही. अशातच नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्न मार्गी लावावा कारण बळीराजांनी भरभरून मतदान करून रेकॉर्ड तोड सरकार निवडून दिले आहे.

या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफ केले जाणार; लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मागील अनेक वर्षापासून शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत त्यात बँकेची हुशारी कारणीभूत ठरत आहे. काही शेतकऱ्यांवर 2003 पासून कर्ज आहे. बँकेने पहिली कर्जमाफी केली तेव्हा कर्ज रकमेची असलेली मुदत आणि यावर व्याज बेरीज करून या रकमेचे आकडेवारी बँकेने शासनाला दिली. या प्रोसेसला पुनर्गठण असे नाव दिले. या हुशारीमुळेच शेतकरी गेल्या तीन कर्जमाफी पासून वंचित राहिला. त्यामुळे आता पुनर्गटन शब्द वगळून सरसकट कर्जमाफी जाहीर करावी. अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार? पहा सविस्तर माहिती”

Leave a Comment